राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दीर्घकाळ टिकलेलं आणि नित्य वर्धिष्णू असलेलं जगातील एकमेव संघटन. या दीर्घायुष्यातच संघटनेची वैशिष्टयं अनुस्यूत आहेत. अशा या संघटनेला वयाच्या नव्वदीत 'मंथन'च्या रूपाने विचारमंथन करावंसं वाटावं, ही बाब स्वागतार्ह आहे. हे संघटन, नव्या विचारांच्या नव्या मनूचं स्वागत करण्याच्या मानसिकतेत असल्याचं द्योतक आहे. अशा चर्चेत सहभागी होणं हे आनंददायी आणि जबाबदारीचं काम आहे, असं मी मानते...
संघासारख्या ९० वर्ष जुन्या मोठ्या संघटनेवर माझ्यासारख्या क्षुल्लक माणसाने टिका करावी … हा लहान तोंडी मोठा घास आहे काय? कदाचित असेल. पण मांडलेले मुद्दे योग्य आहेत कि नाही ? हिंदुच्या हिताचे आहेत कि नाही ? यावर विचार करावा अशी विनंती मी अतिशय तळमळीने आणि मनापासून करतो आहे . ..
माध्यमातला संघ आणि वास्तवातला संघ यांतलं अंतर लवकरात लवकर संपुष्टात येणं गरजेचं आहे, कारण संघ सत्तेत राहून देश बदलण्याच्या तयारीत आहे. संघाची ताकद आणि व्याप्ती पाहता ‘हे होणार नाही’ असं आपण म्हणू शकत नाही. या पार्श्वभूमीवर संघ विचारांच्या मंडळ..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तसा माझा प्रत्यक्ष संबंध खूप कमी आलाय, पण अशी ना तशी संघपरिवाराच्या सामाजिक कार्याची जीवनाच्या बऱ्याच वळणांवर ओळख होत गेली आणि ह्या संस्थेबद्दलचा माझा आदर वाढत चालला. माझे वडील गोव्याच्या स्वातंत्र्यलढयातले एक खंदे सेनानी होते..